Sameer Amunekar
स्वच्छ पाणी, निळाशार समुद्र अन् विस्तीर्ण किनारा! गर्दीपासून दूर 'आरेवारे' बीचवर निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवा खरी शांतता!
हा सुंदर समुद्रकिनारा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रसिद्ध धार्मिक स्थळ 'गणपतीपुळे'पासून हा बीच अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे.
आरेवारे घाटातून प्रवास करताना एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला अथांग समुद्र पाहून तुमचे मन हरखून जाईल! हा प्रवास थक्क करणारा आहे.
व्यावसायिक गर्दी आणि प्रदूषणापासून दूर असल्यामुळे या किनाऱ्यावरील वाळू अत्यंत स्वच्छ आहे. येथील पाण्याचा निळाशार रंग मनाला सुकावून जातो.
जर तुम्हाला कमर्शियल गर्दी नको असेल आणि फक्त समुद्राची गाज ऐकत शांतता अनुभवायची असेल, तर आरेवारे बीच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
येथील विस्तीर्ण किनारा, खडकाळ भाग आणि विहंगम सूर्यास्त यामुळे हा बीच फोटोग्राफी आणि रिल्स बनवण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.