Sameer Amunekar
गोव्यापासून सुमारे 80–90 किमी अंतरावर असलेलं आंबोली, वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट ठिकाण आहे.
उन्हाळ्यातही येथे थंडावा जाणवतो, तर पावसाळ्यात तापमान आणखी सुखद होतं.
पावसाळ्यात संपूर्ण घाट धुक्याने झाकलेला असतो. चारही बाजूंनी दाट जंगलं आणि हिरवीगार झाडं मन मोहून टाकतात.
आंबोली धबधबा, हिरण्यकेशीचे उगमस्थान, निसर्गाने भरलेले लहान-मोठे धबधबे पाहायला मिळतात.
सूर्योदय, ढगांची दाटी, घाटातील वळणं प्रत्येक फ्रेम भन्नाट येते.
शहराच्या गोंगाटापासून दूर, मन:शांती हवी असेल तर आंबोली सर्वोत्तम पर्याय.
आंबोली घाटातून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग अशा कोकणातील ठिकाणी सहज जाता येतं.