Sameer Amunekar
सिंधुदुर्गातील आंबोली घाट आपल्या दाट धुक्यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा संपूर्ण घाट धुक्यात हरवून जातो, ज्यामुळे पर्यटकांना स्वर्गात असल्याचा भास होतो.
या घाटातील वळणावळणांच्या रस्त्यांवरून दिसणाऱ्या अथांग दऱ्या काळजाचा ठोका चुकवतात. हिरवाईने नटलेल्या या खोल दऱ्यांचे दृश्य अत्यंत विलोभनीय असते.
घाटातील वळणे चालकांसाठी एक आव्हान असली, तरी पर्यकांसाठी तो एक थरारक अनुभव असतो. प्रत्येक वळणावर निसर्गाचे एक नवे रूप पाहायला मिळते.
पावसाळ्यात आंबोली घाटात अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होतात. मुख्य आंबोली धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे, जिथे लोक थंड पाण्याचा आनंद घेतात.
हे ठिकाण जैवविविधतेने नटलेले आहे. आजूबाजूला असलेली दाट जंगले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ पक्षी यामुळे निसर्गप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणीच असते.
समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे येथे वर्षभर हवामान थंड असते. गोव्याच्या उष्ण वातावरणातून येणाऱ्या पर्यटकांना या घाटातील थंडावा खूप सुखावह वाटतो.
गोवा आणि महाराष्ट्र यांना जोडणारा हा एक मुख्य दुवा आहे. गोव्यापासून काही तासांच्या अंतरावर असल्यामुळे विकेंड ट्रिपसाठी हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण बनले आहे.