Manish Jadhav
मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात विंध्य पर्वतरांगेत वसलेला अजयगड किल्ला त्याच्या वास्तुकलेसह इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला मध्ययुगीन काळात चंदेल राजांचे प्रमुख केंद्र होता. चंदेल साम्राज्याच्या अस्तानंतरही या किल्ल्याचे महत्त्व कायम राहिले.
विंध्य पर्वताच्या साधारण 600 फूट उंच टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्याची तटबंदी इतकी भक्कल आहे की, याला 'अजय' (ज्याला कोणीही जिंकू शकत नाही) असे नाव पडले.
किल्ल्याच्या आत चंदेल काळातील अनेक सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांवरील नक्षीकाम आणि शिल्पकला खजुराहोच्या मंदिरांची आठवण करुन देते. येथील दगडी कोरीव काम अतिशय सुबक आहे
किल्ल्याच्या माथ्यावर राजा अजयपाल यांचे मंदिर आहे. हे मंदिर स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे स्थान असून, गडावरील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.
गडावर पाण्याचे उत्तम नियोजन पाहायला मिळते. येथे 'अजय पलका' नावाचा एक मोठा तलाव आहे, जो आजही गडावरील पाण्याच्या गरजा पूर्ण करतो. याशिवाय अनेक छोटी कुंडेही गडावर आढळतात.
अजयगड किल्ल्यावरुन केन नदीचे पात्र आणि आजूबाजूच्या घनदाट अरण्याचे विलोभनीय दृश्य दिसते. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
हा किल्ला मध्य प्रदेशातील पन्ना शहरापासून साधारण 34 किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक खजुराहो (साधारण 80 किमी) आहे, जिथून टॅक्सीने अजयगडला पोहोचता येते.