Manish Jadhav
अहमदनगरचा किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि अभेद्य लष्करी वास्तू म्हणून ओळखला जातो.
अहमदनगरचा किल्ला हा भारतातील सर्वात मजबूत भुईकोट किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्याचा आकार अष्टकोनी असून त्याच्या भोवती असलेल्या तटबंदीमुळे तो आजही भक्कम स्थितीत आहे.
या किल्ल्याची निर्मिती निजामशाही सुलतान अहमद निजामशाह याने 15व्या शतकाच्या शेवटी (साधारण 1494 ते 1559 दरम्यान) केली. हा किल्ला अहमदनगर शहराच्या स्थापनेचा साक्षीदार आहे.
किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती सुमारे 60 ते 100 फूट रुंद आणि खोल असा खंदक आहे. पूर्वी या खंदकात पाणी आणि मगर सोडल्या जायच्या, जेणेकरुन शत्रूने हल्ला केल्यास त्यांना प्रवेश करणे अशक्य व्हावे.
1942 च्या 'छोडो भारत' आंदोलनादरम्यान, पंडित जवाहरलाल नेहरु यांना याच किल्ल्यात बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. याच काळात त्यांनी त्यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' येथेच लिहिले.
केवळ नेहरुच नाहीत, तर सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि डॉ. पी.सी. घोष यांसारख्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक दिग्गज नेत्यांना ब्रिटिशांनी या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले होते.
हा किल्ला मिळवण्यासाठी मुघल आणि मराठ्यांमध्ये अनेक युद्धे झाली. 1759 मध्ये पेशव्यांनी मुघलांकडून हा किल्ला जिंकला, तर पुढे 1803 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
स्वातंत्र्योत्तर काळात, अहमदनगरचा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. सध्या येथे भारतीय भूदलाचे 'आर्मर्ड कोअर सेंटर आणि स्कूल' असून हा किल्ला लष्करी क्षेत्रात येतो.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि त्यावरील कोरीव काम आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. किल्ल्याच्या आत असलेले ऐतिहासिक अवशेष आणि येथील शांतता पर्यटकांना इतिहासाच्या काळात घेऊन जाते.