Manish Jadhav
मध्यप्रदेशातील अहिल्या किल्ला हा त्याच्या शांतता आणि वास्तुकलेसाठी जगप्रसिद्ध आहे.
नर्मदा नदीच्या काठी वसलेला हा किल्ला 18व्या शतकात मराठा साम्राज्याच्या महान शासिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला होता. हे ठिकाण त्यांच्या साधेपणाचे आणि कर्तृत्वाचे जिवंत प्रतीक आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी नर्मदा नदीचा विस्तीर्ण आणि भव्य घाट आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरुन नर्मदा नदीचे आणि स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.
या किल्ल्याची वास्तुकला मराठा आणि माळवा शैलीचा संगम आहे. किल्ल्याच्या भिंती, खिडक्या आणि दरवाजांवरील हत्ती, घोडे आणि पौराणिक कथांचे कोरीवकाम पाहून पर्यटक थक्क होतात.
किल्ल्याच्या आत अहिल्यादेवींची 'राजगादी' आणि त्यांचे वैयक्तिक मंदिर आहे. येथे राजमाता न्यायदान करायच्या. आजही हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिथे अहिल्यादेवींची एक मूर्ती स्थापन केलेली आहे.
अहिल्यादेवींनी विणकाम उद्योगाला चालना देण्यासाठी कारागिरांना येथे बोलावले होते. आजही किल्ल्याच्या परिसरात महेश्वरी साड्या विणल्या जातात. या साड्यांच्या पदरावरील नक्षीकाम किल्ल्याच्या कोरीवकामातूनच प्रेरित आहे.
या किल्ल्याचे सौंदर्य इतके अतुलनीय आहे की, 'बाहुबली', 'कलंक', आणि 'पॅडमॅन' सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण या किल्ल्याच्या परिसरात झाले आहे.
इतर किल्ल्यांप्रमाणे येथे केवळ युद्धकथा नाहीत, तर एक प्रकारची आध्यात्मिक शांतता आहे. संध्याकाळी होणारी 'नर्मदा आरती' आणि दीपमाळांचे दृश्य पर्यटकांच्या स्मरणात कायमचे घर करते.