Manish Jadhav
कर्नाटकातील विजापूरमध्ये एका निर्जन ठिकाणी 7 रांगांमध्ये 63 थडगी आहेत. हे ठिकाण 'साठ कब्र' नावाने ओळखले जाते, जे एका भीषण गुन्ह्याचा पुरावा आहे.
ही थडगी कोणत्याही युद्धातील सैनिकांची नाहीत, तर ती आदिलशाहीचा क्रूर सेनापती अफजल खानाच्या 63 पत्नींची आहेत.
1659 मध्ये शिवाजी महाराजांवर चालून जाण्यापूर्वी ज्योतिष्यांनी भाकीत केले होते की, अफजल खान या युद्धातून जिवंत परतणार नाही. या भीतीमुळे खानाने विजापूर सोडण्यापूर्वीच आपली कबर तयार केली होती.
आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नींनी दुसऱ्या कोणाशी लग्न करु नये किंवा त्या कोणाच्या हाती लागू नयेत, या संशयी विचाराने त्याने सर्वांना मारण्याचा भयानक निर्णय घेतला.
खानाने आपल्या 63 पत्नींना विजापूरमधील एका विहिरीत एक-एक करुन ढकलले आणि पाण्यात बुडवून त्यांची निर्घृण हत्या केली.
जेव्हा एक पत्नी जीव वाचवण्यासाठी पळू लागली, तेव्हा तिलाही पकडून क्रूरपणे मारण्यात आले. या सर्व महिलांना एकाच ठिकाणी दफन करण्यात आले.
या ठिकाणी 63 थडग्यांसोबत एक कबर आजही रिकामी आहे. असे मानले जाते की, कदाचित ती वाचलेल्या महिलेसाठी किंवा खानासाठी असावी.
आपल्या पत्नींची कबर स्वतः बांधणाऱ्या खानाची शेवटची इच्छा होती की त्यालाही तिथेच दफन करावे. पण प्रतापगडावर महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि त्याचे थडगे तिथेच राहिले.