Manish Jadhav
मातीच्या माठाला लहान छिद्रे असतात, ज्यातून पाण्याचे बाष्पीभवन होते. या प्रक्रियेमुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते, जे फ्रिजच्या पाण्यापेक्षा आरोग्यासाठी अधिक चांगले असते.
मटक्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान होते. यामुळे पचन सुधारते आणि उन्हाळ्यात होणारा गॅस किंवा अपचनाचा त्रास कमी होतो.
प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्यात अनेकदा रसायने मिसळण्याची भीती असते. मात्र, मातीच्या माठात पाणी साठवल्याने त्यातील नैसर्गिक खनिजे टिकून राहतात, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
मातीची प्रकृती अल्कधर्मी असते, तर आपल्या शरीरात अनेकदा आम्ल तयार होते. माठातील पाणी अल्कधर्मी असल्याने ते शरीरातील 'पीएच' पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
फ्रिजमधील अतिशय थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. मटक्यातील पाणी घशासाठी सौम्य असते, त्यामुळे श्वसनविकार असलेल्या लोकांसाठी हे उत्तम आहे.
मातीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि खनिजे असतात. माठातील पाणी या खनिजांना शोषून घेते, ज्यामुळे पाण्याला एक नैसर्गिक चव मिळते आणि ते शरीरासाठी पौष्टिक ठरते.
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये 'बीपीए' सारखी घातक रसायने असू शकतात. मातीचा माठ पूर्णपणे नैसर्गिक असल्याने ते पाणी विषमुक्त ठेवते आणि पर्यावरणासाठीही पूरक ठरते.