Manish Jadhav
कोणतेही नाते संवादावर टिकते. आपल्या जोडीदाराशी मनातल्या गोष्टी स्पष्टपणे बोला. मनात राग धरुन ठेवण्यापेक्षा चर्चा करुन प्रश्न सोडवणे केव्हाही चांगले.
प्रेम तर सर्वच करतात, पण आदर करणे महत्त्वाचे आहे. एकमेकांचे विचार, आवडीनिवडी आणि निर्णयांचा सन्मान करा. यामुळे नात्यात एक प्रकारची प्रतिष्ठा निर्माण होते.
कामाच्या व्यापातून एकमेकांसाठी वेळ काढा. मोबाईल आणि लॅपटॉप बाजूला ठेवून दिवसातून किमान 15-20 मिनिटे मनापासून गप्पा मारा किंवा फिरायला जा.
विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. एकमेकांपासून गोष्टी लपवू नका. जिथे विश्वास असतो, तिथे संशयाला जागा उरत नाही आणि नाते अधिक घट्ट होते.
माणूस म्हटलं की चुका होणारच. जोडीदाराच्या लहान-लहान चुकांवरुन वाद घालण्यापेक्षा त्या माफ करायला शिका. जुन्या गोष्टी उकरुन काढणे टाळा.
संकटकाळात जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांच्या स्वप्नांना आणि करिअरला पाठिंबा द्या. तुमच्या कौतुकाचा एक शब्दही त्यांना मोठी उमेद देऊ शकतो.
नाते म्हणजे बंधने नव्हे. जोडीदाराला त्यांचे मित्र, छंद आणि स्वतःसाठी थोडा वेळ (Me Time) द्या. एकमेकांना मोकळीक दिल्याने नात्यात गुदमरल्यासारखे वाटत नाही.
नेहमीच मोठ्या सरप्राईजची गरज नसते. कधीतरी 'थँक्यू' म्हणणे, छोटेसे प्रेमाचे मेसेज करणे किंवा आवडता पदार्थ बनवणे या लहान गोष्टी नात्यातील जिवंतपणा टिकवून ठेवतात.