Manish Jadhav
अनेकजण सनस्क्रीन एखाद्या लोशनसारखी अगदी थोडी लावतात. चेहऱ्यासाठी 'टू-फिंगर रुल' पाळणे गरजेचे आहे, तरच कव्हर मिळेल.
सनस्क्रीन लावल्याबरोबर ती त्वचेत शोषली जात नाही. बाहेर पडण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे आधी ती लावणे आवश्यक आहे.
सनस्क्रीनचा प्रभाव केवळ 2 ते 3 तास राहतो. जर तुम्ही जास्त वेळ बाहेर असाल, तर ती पुन्हा लावणे विसरु नका.
ढगाळ वातावरण किंवा पावसाळा असला तरी सूर्याची UV किरणे त्वचेला इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे वर्षभर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
खिडकीतून येणारे ऊन आणि तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधून निघणारी 'ब्ल्यू लाईट' देखील त्वचेला टॅन करु शकते. त्यामुळे घरात असतानाही लाइट सनस्क्रीन वापरणे फायद्याचे ठरते.
भारतीय हवामानासाठी किमान SPF 30 किंवा SPF 50 असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रखर उन्हात फिरत असाल आणि तुमची सनस्क्रीन कमी SPF ची असेल, तर टॅनिंग होणारच.
जुन्या किंवा एक्सपायर झालेल्या सनस्क्रीनमधील सक्रिय घटक (Active Ingredients) निकामी होतात. अशा सनस्क्रीनमुळे संरक्षण मिळत नाहीच, उलट त्वचेवर रॅशेस येण्याचा धोका असतो.