Manish Jadhav
कोकणच्या हापूसची चव ही इतर कोणत्याही आंब्यापेक्षा वेगळी असते. यात साखर आणि आंबटपणाचे एक अचूक संतुलन असते, ज्यामुळे तो जिभेवर रसाळ आणि मधासारखा गोड लागतो.
हापूसची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याचा सुगंध. हा आंबा पिकल्यावर त्याचा दरवळ पूर्ण घरात पसरतो. केवळ वासावरुनच हा आंबा अस्सल हापूस आहे की नाही, हे ओळखता येते.
पिकल्यानंतर या आंब्याला अतिशय देखणा गडद पिवळा किंवा केशरी रंग येतो. याची साल पातळ असते आणि आतला गर अतिशय घट्ट व रसाळ असतो.
रत्नागिरी आणि देवगड हापूसचा आकार हा अंडाकृती आणि देखणा असतो. इतर आंब्यांच्या तुलनेत हापूस दिसायला अधिक आकर्षक आणि रेखीव असतो.
हापूस आंब्याची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे त्यात फायबर (तंतू/केस) नसतात. यामुळे खाताना तो जिभेवर लोण्यासारखा विरघळतो. आमरस करण्यासाठी हा सर्वोत्तम आंबा मानला जातो.
कोकणातील हवामान, तिथली तांबडी माती आणि समुद्राची हवा यामुळे या आंब्याला विशिष्ट चव प्राप्त होते. म्हणूनच कोकणच्या हापूसला 'GI Tag' (भौगोलिक मानांकन) मिळाले आहे, जो त्याच्या गुणवत्तेचा पुरावा आहे.
हापूस आंबा काढणीनंतर काही दिवस उत्तम स्थितीत टिकतो. यामुळेच तो जगभरात निर्यात करणे सोपे जाते. पिकण्याची प्रक्रिया संथ असल्याने त्याची चव हळूहळू अधिक मुरत जाते.