Manish Jadhav
नात्यात दुरावा येत चाललाय, असे वाटत असेल तर जोडीदाराने वेळीच सावध झाले पाहिजे. आज आपण या वेबस्टोरीसाठी माध्यमातून नात्यात दुरावा येण्याचे संकेत जाणून घेणार आहोत.
पूर्वीसारख्या गप्पा आणि मनमोकळा संवाद कमी होऊन फक्त गरजेपुरतेच बोलणे उरणे. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
एकमेकांच्या आनंदात किंवा दुःखात पूर्वीसारखा सहभाग आणि आपुलकी न जाणवणे.
एकमेकांच्या आनंदात किंवा दुःखात पूर्वीसारखा सहभाग, कौतुक आणि आपुलकी जाणवत नाही. एकमेकांच्या आयुष्यात काय चालले आहे याबद्दल उदासीनता निर्माण होणे हे दुराव्याचे मोठे लक्षण आहे.
लहान-सहान कारणांवरुन चिडचिड होणे आणि संभाषणाचे रुपांतर भांडणात होणे. संयमाची जागा जेव्हा रागाने घेतली जाते, तेव्हा परस्पर आदर आणि समंजसपणा संपू लागतो.
मोकळ्या वेळेत सोबत राहण्याऐवजी मित्र, काम किंवा फोनमध्ये व्यस्त राहणे.जेव्हा जोडीदारासोबत घालवलेल्या वेळेपेक्षा दूर राहणे जास्त आरामदायक वाटते, तेव्हा अंतर वाढते.
स्पर्शातील ऊब नाहीशी होणे आणि एकमेकांपासून शारीरिक अंतर राखणे. नात्यातील रोमान्स आणि आपुलकीचा स्पर्श कमी होणे हे भावनिक दुराव्याचे थेट प्रतीक आहे.