गोमन्तक डिजिटल टीम
यंदा राज्यात नवीन विक्रम झाले. गोव्यात पावसाचाच विचार केल्यास सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात तब्बल ४४०० मिमी म्हणजेच १७३ इंच पावसाची नोंद झाली.
राज्यात कमी काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यंदा दरड कोसळणे, पूर येणे, झाडे कोसळणे, घरे पडणे अशा अनेक घटनांची नोंद करण्यात आली.
राज्यात ७ जुलै रोजी २३६ मिमी, १५ जुलै रोजी १६३.६ मिमी आणि १ ऑगस्ट रोजी १३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यातील पाऊस नोव्हेंबर अखेरीपर्यंत सुरूच होता.
राज्यात डिसेंबरच्या सुरुवातील थंडीची चाहूल लागली. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात तसेच अधिक काळ थंडी जाणवणार असल्याचे मत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत
राज्यात तशी आता सौम्य थंडी जाणवत आहे. ग्रामीण भागात हा प्रभाव अधिक जाणवत आहे.
परंतु १७ डिसेंबर रोजी राज्यातील किमान तापमानाचा पारा हा १८.५ अंशांवर गेला होता जे मागील पन्नास वर्षांतील सर्वात किमान तापमान होते.
राज्यातील हवामान पॅर्टनमध्ये होणारे हे बदल धोक्याचे असून आताच जर योग्य ती पावले उचलली नाहीत तर काळ वैऱ्याचा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.