Sameer Amunekar
जाड टेक्स्चर असलेले बॉडी बटर किंवा क्रीम वापरा. आंघोळीनंतर त्वचा अजून थोडी ओलसर असताना क्रीम लावल्यास ओलावा जास्त काळ टिकतो.
खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेलं काढून टाकते. त्यामुळे कोमट पाण्याने कमी वेळात आंघोळ करा. सौम्य, मॉइश्चर-लॉक तत्त्व असलेले बॉडीवॉश वापरा.
भरपूर पाणी, नारळपाणी, सूप किंवा हर्बल टी घ्या. शरीरात पाणी कमी झालं की त्वचा लगेच कोरडी वाटते.
आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरल्याने मृत त्वचेचे थर निघून मॉइश्चरायझर चांगलं शोषलं जातं.
झोपण्यापूर्वी हात-पायांवर ग्लिसरीन + गुलाबपाणी किंवा ओव्हरनाइट मॉइश्चर क्रीम लावा. आवश्यक असल्यास कापडी ग्लोज किंवा सॉक्स घाला.
आंघोळीच्या आधी थोडेसे कोमट नारळतेल किंवा बदामतेल त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ राहते आणि खाज कमी होते.
दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्या. बदाम, सूर्यमुखी बिया, अवोकॅडो यांसारखे व्हिटॅमिन ईयुक्त पदार्थ त्वचेचा कोरडेपणा दूर करतात.