Akshata Chhatre
आपण दररोज मोबाईल नंबर डायल करतो, पण भारतात हा नंबर १० अंकीच का असतो, हे तुम्हाला माहीत आहे का?
यामागचे कारण म्हणजे भारताची विशाल लोकसंख्या आणि एक सुनियोजित गणितीय योजना.
जर हा नंबर ९ अंकी असता, तर देशात केवळ १०० कोटी नंबरच उपलब्ध झाले असते
जे आपल्या वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे नव्हते
याउलट, ११ अंकी नंबर १०० अब्ज शक्यता निर्माण करतो, जो गरजेपेक्षा खूप जास्त आहे आणि डायल करायलाही जास्त वेळ लागेल.
म्हणूनच, १० अंकी नंबर निश्चित करण्यात आला, जो १००० कोटी युनिक नंबरची सुविधा देतो. TRAI ने २००३ च्या आसपास ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही १०-अंकी प्रणाली लागू केली
हा नंबर केवळ ओळख नाही, तर तो एक 'पत्ता' देखील आहे, ज्यातील पहिले चार किंवा पाच अंक टेलिकॉम ऑपरेटर आणि सर्कलची माहिती देतात आणि उर्वरित अंक ग्राहकाचा युनिक नंबर असतात.