Akshata Chhatre
आजच्या काळात प्रेमसंबंधांमध्ये केवळ हृदयाचा नाही तर "थाळीचा" देखील मोठा वाटा आहे.
नात्यांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी हे एक महत्त्वाचे कारण ठरू लागले आहे.
पूर्वी संवाद, विचारसरणी आणि सवयी यांना प्राधान्य दिले जात असे, परंतु आता खानपानाच्या आवडीनिवडींमुळेही वितुष्ट निर्माण होऊ शकते.
विशेषतः एक जोडीदार शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी असेल, तर डेटवर कुठे जेवायचे, घरात काय बनवायचे किंवा सहलीदरम्यान काय खायचे या गोष्टींवरून तणाव वाढतो.
हळूहळू हे वाद टोमण्यांत रूपांतरित होतात आणि जवळीकतेच्या जागी दुरावा निर्माण होतो.
अन्नावरून उद्भवणारे मतभेद टाळण्यासाठी एकमेकांच्या आवडीनिवडींचा आदर करणे, गरज पडल्यास स्वयंपाकघर किंवा भांडी वेगळी ठेवणे आणि दोघांनाही आवडतील असे पदार्थ शोधणे महत्त्वाचे ठरते.
टोमणे मारण्याऐवजी समजूतदारपणा दाखवला तरच नाते अधिक मजबूत होते.