Akshata Chhatre
आंघोळ करणे आवश्यक असले तरी, बहुतेक लोक वापरत असलेला साबण तुमच्या त्वचेसाठी खरंच चांगला आहे का?
इंटरनेटवरील माहितीनुसार, साबण शरीराची घाण आणि बॅक्टेरिया काढतो खरा, पण त्यातील उच्च पीएच गुणधर्म त्वचेचा नैसर्गिक ओलावा आणि पीएच संतुलन बिघडवतात.
यामुळे त्वचा कोरडी, संवेदनशील होते आणि जळजळ होण्याची शक्यता वाढते.
विशेषतः चेहऱ्यासारख्या पातळ आणि नाजूक त्वचेसाठी साबण अधिक हानिकारक असतो.
त्यामुळे साबणाऐवजी काही नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय वापरणे अधिक चांगले ठरते.
गरम पाण्यात टॉवेल भिजवून शरीर घासल्यास घाण निघून जाते.
याशिवाय, बेसन आणि दूध, मुलतानी माती किंवा साधा कच्चा दूध वापरून संपूर्ण शरीरावर स्क्रब केल्यास साबणाशिवाय त्वचेवरील घाण, तेल आणि मृत त्वचेचा थर सहजपणे साफ होतो.