Manish Jadhav
सिंधुदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातील 'कुरटे' नावाच्या बेटावर बांधलेला एक भक्कम जलदुर्ग आहे.
या किल्ल्याची पायाभरणी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये केली होती. स्वराज्याच्या समुद्री सीमांचे रक्षण करणे हा यामागील मुख्य उद्देश होता.
किल्ल्याचा पाया रचताना तब्बल 75,000 किलो (200 मण) शिसे वापरण्यात आले होते, जेणेकरून समुद्राच्या लाटांचा त्यावर परिणाम होऊ नये.
या किल्ल्याची तटबंदी सुमारे 3 किलोमीटर लांब आणि 30 फूट उंच आहे. या भक्कम तटबंदीमुळे हा किल्ला शत्रूसाठी अभेद्य ठरला.
या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव मंदिर आहे, जे त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते.
समुद्राच्या मधोमध असूनही या किल्ल्यावर 'दूधबाव', 'दहीबाव' आणि 'साखरबाव' नावाच्या गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.
गडावर आजही शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे एका घुमटाकार कोनाड्यात जतन केलेले पाहायला मिळतात.
दरवर्षी लाखो पर्यटक या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात. येथे पोहोचण्यासाठी मालवण बंदरातून बोटीने जावे लागते, जो एक रोमांचक अनुभव असतो.