Akshata Chhatre
प्रत्येक नातं हे एका सुंदर बागेसारखं असतं, ज्याला प्रेमाचं आणि विश्वासाचं पाणी दिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याच बोलण्यात काही 'विषारी बिया' लपलेल्या असतात?
नात्यात तुलना करणे हे सर्वात मोठं विष आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरची तुलना इतरांशी, विशेषतः तुमच्या एक्स पार्टनरशी करता, तेव्हा त्यांना वाटतं की ते तुमच्यासाठी पुरेसे नाहीत.
नात्यात चढ-उतार येतात आणि चुका दोघांकडूनही होऊ शकतात. जर तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या पार्टनरलाच पूर्णपणे दोषी ठरवत असाल, तर तुम्ही जबाबदारी घेण्यास घाबरत आहात हे स्पष्ट होतं.
प्रेम म्हणजे स्वातंत्र्य, कोणतीही अट नाही. जेव्हा तुम्ही तुमचे प्रेम एखाद्या कामासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी एक शस्त्र म्हणून वापरता, तेव्हा ते भावनिक ब्लॅकमेल ठरतं.
हे वाक्य ऐकायला शांत वाटत असलं, तरी खरं तर ही संवाद संपवण्याची एक विषारी पद्धत आहे. जेव्हा एखादी महत्त्वाची चर्चा किंवा वाद सुरू असतो आणि तुम्ही हे बोलून बाजूला होता, तेव्हा तुम्ही समस्येवर मोकळेपणाने बोलणे टाळत आहात हे दिसतं.
प्रत्येक वाद किंवा भांडणाच्या वेळी वारंवार ब्रेकअपची धमकी देणे नात्याची मूळं कमकुवत करतं. यामुळे नात्यात भीतीचं आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण होतं.
जर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर यापैकी कोणतेही 'टॉक्सिक फ्रेज' वापरत असाल, तर घाबरू नका. त्यांना ओळखणे हे पहिले पाऊल आहे.