Akshata Chhatre
गोव्यातील एक रमणीय ठिकाण म्हणजे सत्तरी तालुका, आजही पानाफुलांनी समृद्ध असा हा भाग शांत आणि सुंदर आहे.
सत्तरी तालुक्यात झाडांची हिरवीगार झाडी आहेच पण त्यासोबतच पाण्याचा सळसळट आणि पक्षांचा किलबिलाट सुद्धा हवा हवा असा वाटतो.
सत्तरीत एकूण ७० गावं आहेत असं म्हणतात आणि प्रत्येक गावची अशी एक खासियत आहे.
पावसाच्या दिवसांमध्ये तर या गावांमध्ये धबधब्यांची भलीमोठी रांग लागते.
सध्या गोव्यात थंडीचे दिवस सुरु आहेत, या दिवसांमध्ये सत्तरी तालुक्यात नक्कीच भेट द्यावी.
इथे दिवसभरात जरी थंडीचा भास होत नसला तरीही रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी अनुभवता येते.
शेकोटी पेटवून गावोगावी बसलेली लोकं इथे देखील आढळतात.