Manish Jadhav
रामसेजचा किल्ला लढवल्यानंतर आणि गोव्यातील पोर्तुगीजांचा धुव्वा उडवल्यानंतर, मुघल सम्राट औरंगजेबाने आपला मुख्य सरदार शहाबुद्दीन खान आणि खानजहान याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे आर्थिक व लष्करी केंद्र मोडून काढण्यासाठी वाईच्या दिशेने मोठी फौज पाठवली.
औरंगजेबाच्या अफाट सेनेला रोखण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले पराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना वाईच्या रणांगणात तैनात केले. मराठ्यांनी वाई आणि महाबळेश्वरच्या डोंगराळ भागाचा अचूक वापर करत मुघल फौजेची कोंडी केली.
वाईच्या रणांगणात मराठ्यांनी पारंपरिक 'गनिमी कावा' आणि अचानक हल्ले करण्याची पद्धत वापरली. मुघलांची रसद तोडल्यामुळे आणि सह्याद्रीच्या दुर्गम वाटांमध्ये त्यांना घेरल्यामुळे मुघल सेनेत प्रचंड घबराट पसरली.
वाईजवळ दोन्ही सैन्यात समोरासमोर आणि अत्यंत भीषण लढाई झाली. मराठ्यांच्या घोडदळाने मुघल छावणीत थेट घुसून धुमाकूळ घातला, ज्यामुळे मुघल सरदारांना माघार घेणे भाग पडले.
या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुघल सैन्यावर थेट हल्ला चढवला. त्यांच्या या तुफानी आक्रमणामुळे मुघलांचे हजारो सैनिक मारले गेले आणि मुघल सेना रणनीतिकदृष्ट्या पूर्णपणे पराभूत झाली.
या घनघोर युद्धात छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा दारुण पराभव केला. या विजयामुळे औरंगजेबाचा दक्षिण दिग्विजय करण्याचा आणि स्वराज्य जिंकण्याचा प्लॅन पुन्हा एकदा पारधुळीस मिळाला.
वाईच्या लढाईतील विजयाने हे सिद्ध केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य सैनिकीदृष्ट्या तितकेच आक्रमक, सक्षम आणि अभेद्य आहे.