Akshata Chhatre
कोणत्याही नात्याचा शेवट वेदनादायक असतो, पण बहुतेक लोकांना नातं संपेपर्यंत त्यातल्या गंभीर समस्यांची कल्पना नसते, हे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.
नातं तुटण्याची प्रक्रिया एका रात्रीत होत नाही, उलट ते अखेरचा श्वास घेत असताना त्यातला स्पार्क (उत्साह) संपायला लागतो.
जेव्हा एखाद्या पार्टनरला त्याच्या सध्याच्या आयुष्यापेक्षा एकटं राहणं जास्त सुखद वाटू लागतं आणि तो पार्टनरशिवायच्या भविष्याची कल्पना करू लागतो, तेव्हा समजा ही ब्रेकअपची पहिली पायरी आहे.
मानसिक त्रास आणि अपेक्षांचा जास्त भार एखाद्या व्यक्तीवर पडत असेल, तर तो सतत थकलेला किंवा चिडचिडा राहतो.
तुम्ही नातं तोडूही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही, अशा दुहेरी मनस्थितीमुळे ही चिडचिड वाढते.
जर तुमच्या मनात वारंवार हा विचार येत असेल की, 'आपण एकत्र राहण्याचा निर्णय का घेतला?' आणि या नात्यात फक्त तुम्हीच प्रयत्न करत आहात, तर वेळीच सावध व्हा.
अशा दुविधेत जगणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.