Kavya Powar
54व्या इफ्फीमध्ये चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे संवादसत्र आयोजित करण्यात आले होते.
अभिनय आणि वैयक्तिक आयुष्य यांची सांगड घालणे प्रत्येक कलाकाराला जमले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, संपूर्ण जग एक रंगभूमी आहे, आणि आपण सर्वजण आपआपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो.
या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.
तुमचा अभिनय नैसर्गिक वाटला पाहिजे, यासाठी शरीर आणि मन संतुलित ठेवण्याचे महत्त्व पंकज त्रिपाठी यांनी अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले की, स्वतःला व्यक्तिरेखेनुसार घडवण्यासाठी मन आणि शरीराची लवचिकता आणि मोकळेपणा महत्त्वाचा आहे
स्टार आणि अभिनेता यांच्यातला फरकही त्यांनी यावेळी सांगितला
त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि बाळगलेला संयम याच्या आठवणींना उजाळा दिला.
सध्याची पिढी लवकर हताश होते, असे म्हणत त्यांनी तरुणांना आशा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला