Akshata Chhatre
प्रत्येक स्त्रीला तिचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असतं. मग ते चेहऱ्याच्या उजळपणाबाबत असो किंवा अनावश्यक केसांपासून मुक्त होण्याबाबत.
अनेकदा वेक्सिंग, थ्रेडिंगसारखे वेदनादायक उपाय वापरण्यावाचून गत्यंतर उरत नाही, पण आता एक सोपा, घरगुती आणि नैसर्गिक उपाय सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या उपायासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात; पाणी आणि सेंधव मीठ.
एका ग्लास स्वच्छ पाण्यात एक चमचा सेंधव मीठ मिसळून ते पाणी चेहरा धुण्यासाठी वापरल्यास त्वचेला नैसर्गिक एक्सफोलिएशन मिळतं, मृत पेशी दूर होतात, पोर्स साफ होतात, आणि त्वचा सतेज व नितळ दिसते.
नियमित वापर केल्यास काही आठवड्यांतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ नैसर्गिकरीत्या कमी होते.
यामध्ये कोणतेही रसायन नसल्यामुळे संवेदनशील त्वचेसाठीही हा उपाय सुरक्षित असून, त्वचेला नैसर्गिक तेलाचं संतुलन राखत ओलावा टिकवून ठेवतो.
त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठी वेदनादायक उपचारांऐवजी हा साधा घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतो.