दैनिक गोमन्तक डिजिटल
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे (Humidity) त्वचेतील तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात आणि चेहरा तेलकट दिसू लागतो. यामुळे उद्भवणारा चिकटपणा कमी करण्यासाठी योग्य स्किन केअर गरजेची असते.
हवेतील ओलावा आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलामुळे त्वचेची छिद्रे (Pores) ब्लॉक होतात. परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स वाढू लागतात. हे रोखण्यासाठी स्किन केअर महत्त्वाची आहे.
दमट आणि ओलसर वातावरणामुळे हवेत बॅक्टेरिया वेगाने वाढतात. पावसाचे पाणी चेहऱ्याला लागल्यास किंवा घाम साचल्यास त्वचेवर खाज सुटणे, रॅशेस किंवा फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात कडक ऊन नसल्यामुळे अनेकजण स्किन केअरकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मृत त्वचा (Dead Skin) साचून चेहरा निस्तेज आणि काळा पडू लागतो. त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी नियमित काळजी घ्यावी लागते.
अनेकांना वाटते की पावसाळ्यात ढगाळ वातावरण असल्याने सनस्क्रीनची गरज नाही. पण या दिवसांतही सूर्याची हानिकारक अतिनील किरणे (UV Rays) ढगांमधून त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे पिगमेंटेशन वाढते..
पावसाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा आतून डिहायड्रेट होऊ शकते. त्वचा तेलकट वाटत असली तरी तिला आतून पोषणाची गरज असते, म्हणूनच या ऋतूत वॉटर-बेस्ड किंवा जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे ठरते.
हवेतील प्रदूषण आणि चिखलातील धुलीकण दमट हवेमुळे चेहऱ्याला लवकर चिकटतात. जर त्वचा वेळोवेळी स्वच्छ केली नाही, तर हे कण छिद्रांमध्ये जाऊन त्वचा सैल पडू शकते आणि चेहऱ्याचा पोत बिघडतो.
चेहऱ्याच्या तुलनेत डोळ्यांखालील आणि ओठांची त्वचा अत्यंत नाजूक असते. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे ओठ फुटणे किंवा डोळ्यांभोवती संसर्ग होण्याचा धोका असतो, त्यामुळे संपूर्ण चेहऱ्यासोबत या भागांचीही विशेष काळजी घ्यावी लागते