Sameer Amunekar
पावसाळ्यात जीवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. बाहेरून आल्यावर आणि जेवणापूर्वी साबणाने किमान 20 सेकंद हात धुण्याची सवय लावा.
दूषित पाण्यामुळे पोटाचे संसर्ग, टायफॉइड आणि अतिसाराचा धोका वाढतो. नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पिण्याला प्राधान्य द्या.
पावसात भिजल्यानंतर ओले कपडे आणि बूट जास्त वेळ घालू नका. यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि त्वचेच्या समस्या टाळता येतात.
रस्त्यावरील उघडे अन्न किंवा शिळे पदार्थ टाळा. घरी बनवलेले ताजे, गरम आणि स्वच्छ अन्न खाल्ल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.
आहारात हंगामी फळे, हिरव्या भाज्या, व्हिटॅमिन C युक्त पदार्थ, हळद, आले आणि पुरेसे पाणी यांचा समावेश करा. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते.
घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा धोका वाढतो.
ताप, उलट्या, जुलाब, त्वचेवर पुरळ किंवा सतत खोकला यांसारखी लक्षणे दिसल्यास स्वतः औषधे घेण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.