Akshata Chhatre
पावसाळा म्हटलं की सर्दी, खोकला, ऍलर्जी अशा त्रासदायक आजारांचा सगळ्यांना धोका असतो. या काळात त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीची कसोटी लागते.
सकाळी उठल्यावर मुलांना ताजं फळ, भिजवलेले बदाम, किंवा काळे मनुके द्यावेत. हे पदार्थ केवळ ऊर्जा देणारे नाहीत, तर त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक मुलांची रोगप्रतिकारशक्तीही वाढवतात.
आवळा हे ‘विटॅमिन C’ चं नैसर्गिक भांडार असून, संसर्गांपासून शरीराचं रक्षण करतं. जर मुलांना आवळा खायला आवडत नसेल, तर तो च्यवनप्राश, सरबत, लोणचं किंवा मुरंबा अशा स्वरूपात देऊ शकता.
रोज किमान ६० ते ९० मिनिटं खेळणं हे हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचं आहे.
पावसाळ्यात बाहेरचं किंवा पॅकबंद अन्न टाळणं फार गरजेचं आहे. त्याऐवजी मुलांसाठी चविष्ट पण आरोग्यदायी पदार्थ, जसं की भाजीपाला पराठा, घरी केलेली चटणी, सुप किंवा लाडू तयार करा.
मुलांनी केचप मागितल्यास त्यांना घरगुती चटणी खायला द्या. चटणीत असलेले पोषक घटक, फायबर्स आणि हर्ब्स हे पचनासाठी तसेच शरीराच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरतात, जे केचपमध्ये नसतात.
पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना सशक्त, निरोगी आणि आनंदी ठेवायचं असेल तर त्यांच्या आहारात नैसर्गिक, पौष्टिक आणि चविष्ट पर्याय द्यावेत.