Akshata Chhatre
एक चांगला आणि जवळचा मित्र मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे, पण जेव्हा ही घट्ट मैत्री तुटते, तेव्हा जगाचा आधार हरवल्यासारखे वाटते.
मैत्री तुटण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर थेट नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे सततचा ताण, एकटेपणा, रडू येणे आणि कोणत्याही कामात मन न लागणे अशी लक्षणे जाणवतात.
या खोल दुःखातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल म्हणजे, ही मैत्री आता तुटलेली आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारणे.
तुमच्या भावना मनात दडपून ठेवू नका, तर कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींशी चर्चा करा, ज्यामुळे तुम्हाला भावनिक आधार मिळेल.
एक मैत्री तुटली म्हणजे सगळे संपले नाही; तुमच्या शाळेतील किंवा कॉलेजमधील मित्रांना भेटा आणि स्वतःला सोशल लाईफपासून दूर करू नका.
यासोबतच, निश्चित दिनचर्या तयार करा, योगा किंवा तुमचा आवडता छंद जोपासा.
जर या सर्व प्रयत्नांनंतरही तुमचा ताण कमी होत नसेल, तर त्वरित समुपदेशकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.