दैनिक गोमन्तक डिजिटल
पुणे आणि मुंबईकरांसाठी हा १ दिवसाचा सर्वोत्तम वीकेंड स्पॉट आहे.
धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग अनुभवण्यासाठी 'असा' करा प्लॅन!
पुणे किंवा लोनावळाहून 'मळवली' (Malavli) स्टेशन गाठा, तिथून पुढे रिक्षा किंवा पायी जाता येते.मुंबई-पुणे हायवेवरून थेट किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच 'लोहगडवाडी' गावापर्यंत गाडीने जाता येते.
गडाच्या पायथ्यापासून वर जाण्यासाठी प्रशस्त दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत.त्यामुळे चढाई अत्यंत सोपी असून लहान मुले आणि कुटुंबियांसोबतही येथे सहज जाता येते.
गडावर चढताना गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा अशा ४ मजबूत तटबंदीच्या दरवाजांतून जावे लागते.
किल्ल्याच्या एका टोकाला विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा १५०० मीटर लांब कडा आहे.पावसाळ्यात या कड्यावरून वाहणारे वेगवान वारे आणि दरीतून वर येणारे धुके मनाचा थरकाप उडवतात.येथे फिरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडी गावात अस्सल गावरान जेवणाची उत्तम सोय आहे.
पावसात भिजल्यानंतर गरमागरम पिठलं-भाकरी, कांदा भजी आणि कडक चहाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
पावसाळ्यात गडावरील दगड आणि पायऱ्या निसरड्या होतात, त्यामुळे चांगल्या ग्रीपचे शूज वापरा.विंचू कड्यावर किंवा कडेकपाऱ्यांच्या टोकावर जाऊन सेल्फी काढण्याचा जीवघेणा स्टंट करू नका.सोबत रेनकोट आणि पाण्याचे साहित्य आवर्जून ठेवा.
प्रति व्यक्ती फक्त ₹५०० ते ₹८०० च्या बजेटमध्ये हा ट्रेक सहज पूर्ण होतो.
विकेंडची गर्दी टाळण्यासाठी सकाळी लवकर (७ ते ८ च्या दरम्यान) ट्रेक सुरू करणे फायदेशीर ठरते.