दैनिक गोमन्तक
तुळशी म्हणजे देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते, त्यामळे सकाळी आंघोळ केल्याशिवाय तुळशीला हात लावू नये किंवा तोडू नये.
जसे आपण सर्वात आधी देवाला नमस्कार करतो, तसेच तुळशीला नमस्कार केल्यावरच तुळशीचे पानं तोडावी.
तुळशीची पानं कधीही सकाळी किंवा दिवसा तोडून घ्या, सूर्यमावळल्यानंतर पानं तोडल्याने अशुभ मानले जाते.
शास्त्रानुसार असे मानले जाते की, रविवार, एकादशी, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण असतांना तुळशीची पाने तोडू नये.
रविवार, एकादशी अशा दिवशी तुळशीला पाणीही टाकू नये.
तुळशीला फक्त सकाळी पाणी टाकावे, आणि संध्याकाळी दिवा लावूनच प्रदक्षिणा करावी असा नियम आहे.
अनेकदा घरातील सदस्य एक एक करुन तुळशीला कलशाने पाणी अर्पण करतात, पण जास्त पाणी टाकल्याने तुळस सुकते.
तुळशीचे रोप कधीही आग्नेय दिशेला ठेवू नका, कारण ही दिशा अग्नीची दिशा मानली जाते.
कधीही तुळशीची वाळलेली पाने जमिनीवर पडतात, तर ती धुवून रोपातच टाकावीत.
त्यामुळे त्यांच्यावर कधीही पाय पडत नाही किंवा पाने इकडे-तिकडे टाकली जात नाही आणि तुळशीचा अपमानही होत नाही.