Sameer Amunekar
'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण पावसाळ्यात धुक्याने आणि हिरवळीने वेढलेले असते. येथील धबधबा प्रसिध्द आहे. येथील शांतता मन प्रसन्न करते.
शहराच्या मध्यभागी असलेला हा तलाव पावसाळ्यात अत्यंत विलोभनीय दिसतो. तलावाच्या काठावर फिरणे आणि येथील राजवाड्याचे सौंदर्य पाहणे हा एक सुखद अनुभव असतो.
चौकुळ येथील पावसाळ्यात बहरलेला हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे. येथील पांढरेशुभ्र पाणी आणि आजूबाजूचा घनदाट परिसर फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी कावळेसाद पॉइंटला नक्की भेट द्या. पावसाळ्यात येथील दऱ्यांमध्ये ढग रेंगाळताना दिसतात, जे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
हिरण्यकेशी नदीचा उगम जिथे होतो, ते ठिकाण अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात येथील मंदिर आणि पाण्याचा प्रवाह पाहणे खूप रोमांचक असते.
आंबोलीतील हे एक प्रसिद्ध ठिकाण असून येथून कोकणच्या किनारपट्टीचे आणि खोल दऱ्यांचे विलोभनीय दर्शन घडते. पावसाळ्यात येथील धुक्याची चादर पाहण्यासारखी असते.
आंबोलीच्या सहलीचा आनंद पूर्ण करायचा असेल, तर इथल्या अस्सल कोकणी जेवणाची चव नक्की घ्या. पावसाळी वातावरणात गरमागरम सोलकढी आणि कोकणी मासे किंवा शाकाहारी थाळीचा आस्वाद घ्यायला विसरू नका.