दैनिक गोमन्तक
आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त गोवा आणि वाघांचा संबंध काय आहेत हे जाणून घेऊयात.
जंगल नसेल तर वाघांची हत्या होते, वाघ नसेल तर जंगल नष्ट होते, वाघ जंगलाचे रक्षण करतो आणि वनरक्षक वाघांचे रक्षण करतो’.
कर्नाटकातील काळी व भीमगड या अभयारण्यांतून वाघ गोव्यातील अभयारण्यात ये-जा करतात.
2009 पासून अनेक वाघ मारले गेले, त्याला वन खात्याचा निष्क्रियपणा कारणीभूत आहे.
सध्या राज्यात ६ पट्टेरी वाघांचा अधिवास आहे. त्यांचे रक्षण व्हायला हवे.
अन्नसाखळी, निसर्गचक्राला नाकारून आपण पुढे जाऊच शकत नाही, याचे भान सरकारला उरलेले नाही.
वाघ असेल तर जंगल उरेल, जंगल राहिले तर पाऊस पडेल हे साधे गणित विसरून चालणार नाही.