Akshata Chhatre
वडीलधार्यांनी सांगितलेलं “जशी संगत तसे रंग” हे खरंच आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं आहे.
विशेषतः मुलांच्या वाढीच्या काळात, कारण त्या वयात मुलांचं व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि आत्मविश्वास हे खूपच सेंसिटिव्ह असतात आणि लवकर बदलतात.
शिक्षकांना कमी लेखणं किंवा त्यांच्या सल्ल्याचं महत्त्व न मानणं, हे मुलांच्या वाईट संगतीत सापडल्याचं पहिलं लक्षण असू शकतं.
आत्मविश्वास कमी होणं, स्वतःला दोष देणं किंवा सतत "मी हे नाही करू शकत" असं म्हणणं; यामागे वाईट संगतीतून आलेल्या नकारात्मक विचारांचा परिणाम असू शकतो.
अचानक गुप्तता वाढवणं, स्क्रीन लपवणं किंवा पालकांच्या नजरेपासून संवाद लपवणं हे सतर्क राहण्याचं मोठं कारण ठरू शकतं.
अभ्यास किंवा गृहपाठ न करणं, शाळेपासून उगाच टाळाटाळ करणं, ही केवळ आळशीपणाची नाही तर चुकीच्या संगतीचीही लक्षणं असू शकतात.
मुलाशी संवाद वाढवा, त्यांना समजून घ्या, फक्त शिस्त लावण्याऐवजी त्यांच्यासोबत मैत्रीचं नातं ठेवा. त्यांच्या मित्रमंडळींना ओळखा, शक्य असेल तर भेटा किंवा घरात बोलावून घ्या.
त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करा, आत्मविश्वास वाढवणारे छोटे अनुभव द्या आणि सर्वात महत्त्वाचं प्रेम, समजून घेणं आणि पाठिंबा देणं हेच दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरतं.