Pranali Kodre
दिल्ली कॅपिटल्स संघाने वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामात थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
दिल्लीने डब्लूपीएलमध्ये साखळी फेरीनंतर 8 पैकी 6 सामने जिंकून 12 पाँइंट्स मिळवले.
महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्सचे देखील साखळी फेरीनंतर 8 पैकी 6 सामन्यातील विजयानंतर 12 पाँइंट्स आहेत.
त्यामुळे या स्पर्धेत साखळी फेरीनंतर सर्वाधिक पाँइंट्स मिळवणारे हे दोन संघ ठरले.
मात्र, दिल्लीचा नेट रनरेट मुंबईपेक्षा अधिक असल्याने गुणतालिकेत दिल्लीने मुंबईला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.
साखळी फेरीनंतर दिल्लीचा नेट रनरेट +1.856 इतका आहे, तर मुंबईचा नेट रनरेट +1.711 इतका आहे.
डब्ल्यूपीएलच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अव्वल क्रमांकावर राहणारा संघ थेट अंतिम सामन्याला पात्र ठरणार आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांना एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे.
याच नियमामुळे दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
तसेच मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना आता गुणतालिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा संघ युपी वॉरियर्स विरुद्ध एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे.
24 मार्चला होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघातील एलिमिनेटरच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ 26 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.