Akshata Chhatre
गोव्याचं सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहेच पण,तुम्हाला माहितीच असेल हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे मग या लहानशा राज्यात ३.५ दशलक्ष लोकं कसे राहत असतील?
गोवा फक्त ३,७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला आहे. हे क्षेत्रफळ मुंबई शहराच्या तुलनेत खूपच लहान आहे. तरीही, इथे ३५ लाख लोकं राहतात.
पर्यटनस्थळ असल्याने गोव्यात स्थानिकांसह अनेकवेळा पर्यटकांची ये जा सुरु असते. अनेकवेळा चांगले जीवनमान आणि रोजगाराच्या संधींमुळे लोक इथे स्थायिक होतात.
गोव्यातील शहरीकरण वेगाने होत आहे. नवीन घरे, रस्ते आणि इतर सुविधांमुळे लोकसंख्या वाढत आहे. पण, यामुळे पर्यावरणावर देखील परिणाम होत असल्याचं सांगितलं जातं.
पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. त्यामुळे, देशभरातून आणि जगभरातून लोक इथे येतात. काही लोक कायमचे स्थायिक होतात.
गोव्यातील जीवनशैली शांत आणि सुंदर आहे. पण, गर्दीमुळे वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होतात.
गोव्यातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी योग्य नियोजन आणि विकास आवश्यक आहे. निसर्ग आणि संस्कृती जपून, गोव्याचे सौंदर्य टिकवणे महत्त्वाचे आहे.