Akshata Chhatre
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, झोपेचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे केस गळतीची समस्या वाढत आहे.
बाजारात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडिशनर यामुळे ही समस्या आणखी गंभीर होते.
केसांना नियमित तेलाने मसाज करणे सर्वात आवश्यक आहे. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचते.
केसांच्या वाढीसाठी प्रोटीन हा अत्यावश्यक घटक आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमजोर होतात. यासाठी, मोड आलेले कडधान्य, मेथीच्या बिया आणि दह्याचे मिश्रण करून एक प्रोटीन मास्क तयार करा.
बाजारातील शॅम्पूमध्ये जास्त रसायने असतात, ज्यामुळे केस कोरडे आणि कमजोर होतात. त्याऐवजी, आवळा आणि रीठा पावडर पाण्यात उकळून तयार केलेले पाणी शॅम्पूप्रमाणे वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी त्याचे पाणी केसांवर वापरा. यातील अमिनो आम्ल आणि जीवनसत्त्वे केस मऊ, चमकदार आणि मजबूत करतात.
तेजपत्ता पाण्यात उकळून त्याचे गाळलेले पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांवर हे पाणी शिंपडल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ जलद होते.