Ganeshprasad Gogate
कोणत्याही लागवडीशिवाय, रासायनिक खतांशिवाय मिळणाऱ्या या रानभाज्या गोमंतकियांच्या ताटात मानाचं स्थान निर्माण करत मन तृप्त करताहेत.
पावसाळा सुरू झाला की आठवडाभरातच विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात दाखल होतात.
टाकळ्याच्या भाजी खाल्ली असता खरूज, अंगास येणारी खाज थांबते. प्रमेह म्हणजे लघ्वीच्या विकारात टाकळ्याची फुले 10 ग्रॅम, खडीसाखर 10 ग्रॅम घालून सेवन केल्यास आराम मिळतो.
काळे अळू भाजीला फार उत्तम आहे. ही भाजी खाल्ल्याने मल व मूत्र साफ होतात. ही भाजी साधारण थंड उष्ण प्रकृतीच्या माणसांस चांगली मानवते. ही भाजी अग्निदीपक आहे.
सुरणाला अर्शघ्न असे म्हणतात. अर्शघ्न म्हणजे मूळव्याधीचा नाश करणारा. सुरणाची भाजी मूळव्याध असलेल्या माणसांनी खाल्ली तर मूळव्याधी बरी होते.
मुतखड्यावर याच्याइतके मोठे औषध नाही. कुरडूच्या बिया १ ग्रॅम बारीक कुटून त्यात तितकीच साखर घालून ते दुधातून घ्यावे, लघवीचे विकार बरे होतात..