Akshata Chhatre
गणेशचतुर्थी, नुसता सण नाही तर प्रत्येकाचा जीव आहे. वर्षभर वाट पाहून येणारा हा दिवस घरात उत्साहाचे वातावरण घेऊन येतो.
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी घर सजवले जाते, नवीन सजावट केली जाते आणि घरोघरी आनंदाचे वारे वाहू लागतात. देवासाठी गोडधोड पदार्थ, विशेषतः मोदकांचे नैवेद्य तयार केले जातात.
गणेशोत्सवाच्या काळात दीड, पाच, सात, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली जाते
या काळात घुमट आरतीला विशेष महत्त्व आहे. पारंपरिक वाद्य घुमटच्या तालावर होणारी ही आरती एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देते.
गोव्याची खास ओळख असलेली 'माटोळी' देखील चतुर्थीचे एक खास आकर्षण आहे.
माटोळीमध्ये स्थानिक फुलांचा, फळांचा आणि वनस्पतींचा वापर करून एक सुंदर सजावट तयार केली जाते, जी गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.
गणपती बाप्पांचे आगमन हे केवळ धार्मिक विधी नसून, कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणणारा, आनंद आणि सकारात्मकता पसरवणारा एक सोहळा आहे.