गोमन्तक डिजिटल टीम
चांदीची चेन गळ्यात घातल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
सकाळी लवकर उठून अनुलोम-विलोम प्राणायाम रोज केला पाहिजे. याने जन्मकुंडलीत सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीमध्ये संतुलन राखले जाते.
दुर्गा सप्तशतीच्या मध्यचरित्राचा प्रत्येक बुधवारी पाठ करा. असे केल्याने बुद्धिमत्ता तीव्र होण्यास सुरवात होते असे मानले जाते.
दर बुधवारी गणेशाला दुर्वा अर्पण केल्यास तुमची मानसिक स्थितीही कणखर होते आणि तुमचा सर्व ताणदेखील कमी होतो.
उगवत्या सूर्याला नियमित थोडे कुंकू आणि लाल फुलं मिसळून पाणी अर्पण करा. असे केल्याने मन शांत होते आणि इच्छेनुसार कार्य सिद्धीस जाते.
रात्री झोपण्याच्या आधी 5 ते 7 मिनिटे इष्टदेवाचे ध्यान करा आणि मन स्थिर झाल्यानंतर शांत मनाने झोपा. अशाने तुमची मानसिक चिंता कमी होते.