Akshata Chhatre
श्रीमद्भगवद्गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्यासाठीचे एक वैज्ञानिक मार्गदर्शन आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मनुष्याचे मन हेच त्याचा सर्वात मोठा मित्र आणि सर्वात मोठा शत्रू आहे.
जो मनावर नियंत्रण ठेवतो तो स्वतःला जिंकतो, तर जो मनाच्या अधीन राहतो तो स्वतःच स्वतःचा शत्रू ठरतो. मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स देखील हेच सांगतात.
प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते.” म्हणूनच, गीता आपल्याला सांगते की परिणामाची चिंता न करता प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे.
योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल. आधुनिक विज्ञानानेही हे सिद्ध केले आहे की नियमित साधना, पुरेशी झोप, संयमित आहार आणि योग्य दिनचर्या मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारतात.
सात्त्विक आहार पवित्र, हलका व आरोग्यदायी असतो, जो विशेषतः मुलांच्या वाढीसाठी आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त आहे.
श्रीमद्भगवद्गीतेतील हे उपदेश आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तरी ते तितकेच लागू पडतात. आत्मज्ञान, कर्तव्य, संतुलन आणि सकारात्मकता हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे गीता आपल्याला शिकवते.