Rahul sadolikar
जमीन या पहिल्याच चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीने दुसऱ्या चित्रपटात अजय देवगन, तुषार कपूर, अर्शद वारसी यांना घेऊन विनोदी चित्रपटाचं धाडसच केलं होतं
खामोशी द म्युझिकल या पहिल्या चित्रपटाच्या अपयशानंतर सलमान खान, ऐश्वर्या रॉय आणि अजय देवगनसोबत संजय लीला भन्साळी यांनी मोठेच यश मिळवले होते
शिमित अमीन या दिग्दर्शकाचा अब तक छप्पन हा चित्रपट तसा बरा चालला पण चक दे इंडिया या आपल्या दुसऱ्या चित्रपटात त्याने यशाचं शिखर गाठलं हा शाहरुखच्या सर्वात चांगल्या परफॉर्मन्सपैकी एक मानला जातो.
'सोचा ना था' या आपल्या पदार्पणााच्या चित्रपटाच्या अपयशानंतर इम्तियाज अलीने आपल्या दुसऱ्या 'जब वी मेट' या चित्रपटात यशाचा षटकारच लावला होता.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक आदित्य चोप्राने आपला पुढचा चित्रपट मोहब्बते बनवला. या त्याच्या पहिल्या चित्रपटापेक्षा बिग बजेट सिनेमा होता.
दिग्दर्शिका फराह खानने आपल्या ओम शांती ओमच्या माध्यमातून एक बिग बजेट चित्रपट बनवला होता.
तान्हाजीच्या मोठ्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतने आदिपुरूष चित्रपटाच्या माध्यमातून एका बिग बजेट चित्रपटाचे स्वप्न पाहिले आहे.
लक बाय चान्सच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या झोया अख्तरला कौतुक तर मिळालं पण बॉक्स ऑफिसवर कलेक्शन तितकं झालं नाही पण तिने आपल्या दुसऱ्या चित्रपटात 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये चांगलेच यश मिळवले.
कुछ कुछ होता है च्या यशानंतर करण जोहरने तीन पिढ्यांच्या सुपरस्टार्सना एकत्र आणले होते.. कभी खुशी कभी गम मधुन करणने अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि हृतिक रोशनला एकत्र आणले होते.