Akshata Chhatre
श्रावण महिन्यात केस आणि नखं न कापण्याची परंपरा धार्मिक आणि वैद्यकीय दोन्ही कारणांमुळे मानली जाते.
हा महिना निसर्गाच्या वाढीचा आणि पावित्र्याचा काळ मानला जातो, त्यामुळे त्या काळात केस व नख वाढू द्यावेत असं मानलं जातं
श्रावण महिन्यात पावसामुळे शेती, झाडं, पिकं यांचा विकास आणि वाढ होतो. त्याचप्रमाणे शरीराचे केस व नखं नैसर्गिकरीत्या वाढू द्यावेत, असा विचार केला जातो.
काही परंपरांमध्ये असं मानलं जातं की केस आणि नखं ही आपल्या शरीरातील प्राणशक्तीचा विस्तार आहेत. त्यांना त्या काळात न कापल्याने ही शक्ती व उत्साही प्रवाह अबाधित राहतो.
श्रावण महिना पावसाळ्यात येतो. या काळात ओलावा जास्त असल्यामुळे जखमा लवकर न भरल्याची शक्यता असते, त्यामुळे केस किंवा नखं कापताना जर थोडं जरी लागलं, तर संसर्ग होऊ शकतो.
ओलाव्यामुळे वस्तू गंजतात. उदा. ब्लेड, कात्री, किंवा रेझर आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असतो. त्या काळात काही जण स्वतःवर संयम ठेवला जातो आणि म्हणूनच केस व नख न कापणं हे त्याचा भाग मानलं जातं.