Akshata Chhatre
पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि अंगदुखी यांसारखे त्रास खूपच सामान्य आहेत, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये हे त्रास अधिक प्रमाणात दिसून येतात.
गळा खवखवणं, नाक वाहणं, शिंका येणं आणि सतत खोकला यामुळे जीवनमानावर परिणाम होतो.
आले आणि मधाचं मिश्रण गळ्याच्या त्रासावर अतिशय गुणकारी असून, यामध्ये सूज कमी करणारे आणि गळ्याला मऊपणा देणारे गुणधर्म असतात.
तसेच वाफ घेणं श्वसन मार्ग मोकळा करतं आणि सर्दीच्या लक्षणांपासून आराम मिळवून देतं.
तुळस, काळी मिरी आणि आले यांचा काढा शरीरात उष्णता निर्माण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
गुळ आणि हळदीचं पेयही गळा स्वच्छ करून अंगदुखीवर आराम देतं. या उपायांबरोबरच थंड पदार्थ, थेट एसीचा थंड वारा, ओले कपडे आणि फ्रीजमधील अन्नपदार्थ टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
अंग झाकून ठेवणं, गरम पाणी पिणं आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं हे सर्व संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात.