Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान करणे हे केवळ कर्तव्य नसून तो एक संस्कार मानला होता. परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण त्यांनी आपल्या मावळ्यांना दिली होती.
जेव्हा मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला नजर म्हणून आणले, तेव्हा महाराजांनी तिला साडी-चोळी देऊन सन्मानाने परत पाठवले. "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती, आम्हीही सुंदर झालो असतो" हे त्यांचे उद्गार आजही अजरामर आहेत.
लढाईत विजय मिळवल्यानंतर शत्रू पक्षाच्या स्त्रियांना आणि लहान मुलांना इजा न पोहोचवण्याचे कडक आदेश महाराजांनी आपल्या सैन्याला दिले होते. स्त्रियांना कैद न करता त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी ते स्वतः घेत.
स्वराज्यात जर कोणी स्त्रीचा विनयभंग किंवा अनादर केला, तर महाराज त्याला कठोर शिक्षा देत असत. रांझाच्या पाटलाचा प्रसंग याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे स्त्रीवर अन्याय करणाऱ्याचे हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्यात आली होती.
शिवाजी महाराजांनी युद्धाच्या नियमांमध्ये स्त्री सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले होते. "सैन्याने कोणत्याही स्त्रीच्या केसालाही धक्का लावता कामा नये," अशी त्यांची कडक शिस्त होती.
स्वराज्यातील विधवा स्त्रिया आणि अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वराज्याची असेल, असा महाराजांचा नियम होता. त्यांनी अनेक स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले.
महाराजांच्या या उदात्त दृष्टिकोनाचे श्रेय राजमाता जिजाऊंच्या संस्कारांना जाते. आईने दिलेल्या शिकवणीतूनच महाराजांनी परस्त्रीला आई आणि बहिणीचे स्थान दिले.
सत्ता आणि संपत्ती मिळवताना नीतिमत्ता कधीही सोडायची नाही, हे महाराजांचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणे हे स्वराज्याच्या यशाचे खरे गमक आहे, असे ते मानत.