Chhatrapati Sambhaji Maharaj: सह्याद्रीचा छावा धडकला, बुऱ्हाणपूरच्या 17 पेठांत मराठ्यांचा झंझावात; शंभूराजांच्या स्वारीनं हादरली मुघल सल्तनत

Manish Jadhav

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर बसल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच केलेली बुऱ्हाणपूरची स्वारी ही मुघल सत्तेचा पाया हादरवून टाकणारी एक ऐतिहासिक घटना होती.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

धोरणात्मक उद्देश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मुघल बादशाह औरंगजेबाला वाटले होते की स्वराज्य कमकुवत झाले आहे; हे चुकीचे ठरवण्यासाठी आणि मुघलांना जरब बसवण्यासाठी संभाजी महाराजांनी ही धाडसी मोहीम आखली.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

बुऱ्हाणपूर शहराचे महत्त्व

बुऱ्हाणपूर हे दक्षिण भारतातील मुघलांचे सर्वात श्रीमंत शहर आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र होते, जेथे मुघलांची मोठी रसद आणि संपत्ती साठवलेली असे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

स्वारीचा काळ

जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांनी अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने या मोहिमेचे नियोजन केले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

वेगवान हालचाल

मराठ्यांचे सैन्य इतक्या वेगाने बुऱ्हाणपूरच्या वेशीवर पोहोचले की, तेथील मुघल सुभेदार खानजहान बहादूर याला सावरायला अजिबात वेळ मिळाला नाही.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

मोठी लूट

मराठ्यांनी सलग तीन दिवस बुऱ्हाणपूरमधील मुघलांच्या 17 पेक्षा जास्त पेठांवर हल्ला करुन अफाट संपत्ती, सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तू स्वराज्यात आणल्या.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

लष्करी विजय

या स्वारीत मराठ्यांनी केवळ लूटच केली नाही, तर बुऱ्हाणपूरच्या संरक्षणासाठी असलेल्या मुघल सैन्याचा दारुण पराभव केला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

औरंगजेबाला चपराक

या विजयामुळे औरंगजेबाचा अहंकार दुखावला गेला आणि त्याला स्वतः दख्खनमध्ये उतरण्यास भाग पाडले, ज्यामुळे पुढील 27 वर्षांच्या संघर्षाची ठिणगी पडली.

Chhatrapati Sambhaji Maharaj

Pomegranate Juice: "सूर्याच्या कोपावर डाळिंबाचा प्रहार!" उन्हाळ्यातील प्रत्येक समस्येवर एकच 'लाल' उपाय!

आणखी बघा