Chhatrapati Sambhaji Maharaj: स्वराज्यात फितुरीला स्थान नाही! छत्रपती संभाजी महाराजांचा धोरणी 'राज्यकारभार'

दैनिक गोमन्तक डिजिटल

अष्टप्रधान मंडळाचा वारसा

संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळ कायम ठेवले आणि त्याद्वारे राज्यकारभाराची घडी बसवली.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

कवी कलश यांचे सहकार्य

प्रशासकीय कामात आणि सल्लागार म्हणून त्यांनी कवी कलश यांना महत्त्वाचे स्थान दिले होते. कवी कलश यांनी महाराजांना अनेक कठीण प्रसंगांत आणि राजनैतिक निर्णयांत साथ दिली.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

आर्थिक धोरण व महसूल व्यवस्था

स्वराज्याची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी महसूल व्यवस्थेत सुधारणा केल्या. युद्धाच्या काळातही प्रजेवर अन्याय होणार नाही आणि शेतीचे नुकसान होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

न्यायदान व्यवस्था

संभाजी महाराज स्वतः न्यायदानाच्या कामात लक्ष घालत असत. त्यांनी अनेक प्रलंबित खटले निकाली काढले आणि प्रजेला न्याय मिळवून दिला. त्यांच्या काळातील अनेक 'महजर' (न्यायनिवाडे) आजही त्यांच्या न्यायप्रियतेची साक्ष देतात.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

धार्मिक व सांस्कृतिक कार्य

महाराजांनी अनेक देवस्थानांना वर्षासने आणि इनामे देऊन धार्मिक वारसा जतन केला. तसेच ते स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृतचे गाढे पंडित होते, त्यांनी 'बुधभूषण' सारख्या ग्रंथांची निर्मिती करून सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

अखंड युद्धनीती

त्यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात स्वराज्यावर मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा शत्रूंचे एकाच वेळी आक्रमण झाले होते. या सर्व आघाड्यांवर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे लढा दिला आणि स्वराज्य सुरक्षित ठेवले.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

आरमार आणि किल्ले संवर्धन

शिवरायांप्रमाणेच संभाजी महाराजांनी आरमाराकडे विशेष लक्ष दिले. तसेच स्वराज्यातील किल्ल्यांची डागडुजी आणि नवीन बांधकामांकडे (उदा. फोंडा किल्ला) त्यांनी बारकाईने लक्ष दिले.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

शिस्तबद्ध प्रशासन

लष्करी आणि मुलकी प्रशासनात त्यांनी कडक शिस्त पाळली. फितुरी करणाऱ्यांना त्यांनी कठोर शासन केले, जेणेकरून स्वराज्याची सुरक्षा अबाधित राहील.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

Rama Krishna Beach: लाटांची गाज अन् मनाची साद! सागरी पर्यटनाचा मुकुटमणी 'रामकृष्ण बीच'; पर्यटकांच्या आवडीचं नंदनवन

आणखी बघा