चाणक्यनीतीनुसार,सुखी मॅरिड लाईफचा मंत्र आहे 'एवढा' सोपा

Akshata Chhatre

चुकीचे निर्णय

प्रेमाच्या आंधळेपणात हरवलेल्या तरुण मुली अनेकदा भावनांच्या भरात चुकीचे निर्णय घेतात, विशेषतः विवाहासारख्या आयुष्यभराच्या निर्णयात.

Chanakya Niti marriage| happy married life tips | Dainik Gomantak

भावना

आजच्या काळात नाती रूप आणि भावना यावर आधारलेली असली तरी त्यात पुढे जाऊन तणाव, दुरावा आणि अविश्वास निर्माण होतो.

Chanakya Niti marriagChanakya Niti marriage| happy married life tipse| happy married life tips| | Dainik Gomantak

चाणक्य

म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी चाणक्यांनी दिलेले काही मूलभूत, शाश्वत आणि आजही लागू होणारे सल्ले लक्षात घेणे गरजेचे आहे.

Chanakya Niti marriage| happy married life tips | Dainik Gomantak

चाणक्य नीती

चाणक्य नीती सांगते की जोडीदार निवडताना फक्त देखणेपणा, पैसा किंवा हुद्दा पाहू नये; तर स्वभाव, विचार, कुटुंबातील वागणूक, आर्थिक शिस्त, जबाबदारी, संकटात वागण्याची पद्धत आणि पत्नीला दिला जाणारा आदर यांचा खोल अभ्यास आवश्यक आहे.

Chanakya Niti marriage| happy married life tips | Dainik Gomantak

क्षणिक

चाणक्यानुसार रूप क्षणिक असते, पण स्वभाव आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे संयमी, समजूतदार आणि सहनशील स्वभावाचा पुरुषच खरा जीवनसाथी ठरतो.

Chanakya Niti marriage| happy married life tips | Dainik Gomantak

कुटुंबाचा आदर

जो आपल्या कुटुंबाचा आदर करतो, महिलांना सन्मान देतो, त्याच्याकडूनच पत्नीला देखील मान-सन्मान मिळतो. फक्त सध्या पैसा आहे म्हणून जोडीदार निवडणे चुकीचे ठरू शकते.

Chanakya Niti marriage| happy married life tips | Dainik Gomantak

विचारपूर्वक निर्णय

म्हणून तरुण मुलींनी लग्नाचा निर्णय केवळ भावनेच्या आधारे न घेता, चाणक्य नीतीनुसार विचारपूर्वक, स्वाभिमानाने आणि प्रगल्भ बुद्धीने घ्यावा.

Chanakya Niti marriage| happy married life tips | Dainik Gomantak

एकुलत्या एक मुलाचे पालक आहात? 'हे' नक्की वाचा

आणखीन बघा