Pramod Yadav
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपानंतर भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढला आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील नव्याने निर्माण झालेल्या वादाची चर्चा जगभर होत आहे.
खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा हात असू शकतो, असा आरोप ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला.
भारतीय राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांची हकालपट्टी करण्यात आली.
भारत सरकारने हे आरोप फेटाळून लावत, आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आणि 5 दिवसांत देश सोडण्यास सांगितले आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमधील या वादाचे पडसाद जगभरात उमटले असून, सर्व देश या घडमोडीकडे लक्ष ठेवून आहेत.
अलिकडेच भारतात झालेल्या जी२० बैठकीसाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी उपस्थिती लावली होती.