Pramod Yadav
करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर गुरूवारी पारंपरिक रापणीच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणावर मासळी सापडली.
मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान तर दिसलेच शिवाय येथे आलेल्या लोकांनीही पिशव्या भरून नुस्ते घरी नेले.
61 दिवसांच्या बंदीनंतर 01 ऑगस्टपासून राज्यात मासेमारी सुरू झाली आहे.
पारंपरिक रापणीच्या पद्धतीने राज्यात मासेमारी करण्याचे प्रमाण मोठे आहे.
करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर आज मोठ्या प्रमाणावर मासळी सापडली.
मोठ्या प्रमाणावर सापडेल्या मासळीमुळे मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.