Ganeshprasad Gogate
रिकाम्या पोटी जांभूळ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. रिकाम्या पोटी जांभुळ खाल्ल्याने अॅसिडीटी, पोटदुखी, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.Dainik Gomantak
जांभूळ आणि हळद एकत्र कधीही खाऊ नका. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच हळदयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते.
दूध आणि जांभूळ एकत्र सेवन केल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेऊ नका
लोणचे आणि जांभूळ एकत्र खाऊ नका. या दोन गोष्टींच्या मिश्रणाने पोटाचा त्रास होऊ शकतो. जांभूळ खाल्ल्यानंतर किमान 1 तास लोणचे टाळले तर बरे होईल.
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे त्यामुळे पोटात मळमळ, उलटी असे आजार होऊ शकतात